Posts

पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production

Image
पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production श्री गणेश म्हणजे ज्ञान आणि समृद्धीची देवता. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो गणपती. कुठल्याही समारंभाची सुरुवात त्या विघ्नेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही.                               गणेशोत्सव आता जरी संपूर्ण भारतात आणि जगात साजरा केला जात असला तरी गणेशोत्सवाच जन्मस्थान हे पुणेच आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. हेतूहा होता या सन उत्सवाच्या निमित्ताने भारतीय लोक एकत्र येतील विचारांची देवाण-घेवाण होईल आणि त्यातून ब्रिटीश विरुद्ध लढण्यासाठी एक वज्रमुठ तयार होईल आणि झालही तसचं. तो आपल्या समृद्ध इतिहासाचा भाग आहे. या पुण्यातील गणेशोत्सवाच महत्व व मानाचे अशे 5 गणपती प्रतिष्ठाने आहेत त्यांची माहिती व इतिहास आपण समजावून घेऊयात. १) कसबा गणपती :- विनायक ठाकर यांच्या घराजवळ एक गणेशमूर्ती सापडली. हे स्थान लाल महालाच्या जवळच होते त्यानंतर इ. स. १६३९ मध्...

Pataleshwar Cave Temple | पाताळेश्वर मंदिर | Pune Maharashtra | Incredible Maharashtra

Image
Pataleshwar Temple देवता आकाशातील असोत किंवा पाताळातील देवांचा देव एकच महादेव.  पुण्याच्या मध्यवर्ती  ठिकाणी असलेलं हे प्राचीन शिवमंदिर पुणेकरांना कायम आपलसं वाटत. गुहेच्या समोर एका विशाल दगडामध्ये कोरलेले नंदीमंडप आहे. मुख्य गुहा आयताकृती आहे, आधारासाठी दगडी खांब दिसून येतात या लेण्या पाहिल्यानंतर वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या ची आठवण येते. गुहेच्या मध्यभागी शिवलिंग आहे भगवान शिव यांच्या अनेक पौराणिक कथा दर्शविणारी शिल्पे या ठिकाणी पाहावयास मिळतात. हे पुण्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. जवळजवळ चारशे वर्षांहुनही प्राचीन असे हे मंदिर आहे हे राष्ट्रकुट काळात कोरलेले आहे.

Shivneri Fort | किल्ले शिवनेरी | संपूर्ण इतिहास व माहिती

Image
किल्ले शिवनेरी (Shivneri Fort) नमस्कार मित्रांनो Incredible Maharashtra या Blog वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या वंदनीय व लाडक्या राजाच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला अर्थात किल्ले शिवनेरीला. समजून घेणार आहोत शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. अनुभवणार आहोत शिवनेरीचा  इतिहास. शिवनेरी निसर्गात:च पवित्र तीर्थक्षेत्र आणि संरक्षक  गडकोटांच्या कड्यांनी वेढलेला  आहे. किल्ल्याच्या पूर्वेस ओझर,नारायणगड उत्तरेस लेण्याद्री,हरिश्चंद्रगड पश्चिमेस भीमाशंकर,चावंड,हडसर, जीवधन दक्षिणेस राजमाची, ढाक आणि वायव्येस कुकडेश्वर महादेव इत्यादी तीर्थक्षेत्र आणि गडकोटांनी वेढलेला आहे. शिवनेरीचा आकार  शंकराच्या पिंडीसारखा आहे. इ.स. 1443 मध्ये मलिक उल तुझार याने यादवांचा पराभव केला व शिवनेरी बहमनी राजवटीखाली आला. पुढे इ.स. 1440 मध्ये निजामशाहीची स्थापना झाली व पुढे इ.स. 1470 मध्ये मलिक उल तुझारचा प्रतिनिधी मलिक मुहम्मद यांनी किल्ला सर केला. इ.स. 1493 मध्ये इथली राजधानी अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स.वी सन 1565 मध्...

Yugandhar Marathi Book Review by Govind Joshi | युगंधर | Shivaji Sawant | Jay shri krishna

Image
युगंधर शिवाजी सावंत यांची आणखी एक अप्रतीम कादंबरी.मी त्यांची वाचलेली ही दुसरी कादंबरी (पहीली अर्थातच म्रत्युंजय)...म्हणुन उत्सुकतेपोटी आणी खरं सांगायचं तर ही माझ्या मिञाची (ज्ञानेश्वर पठाडे) सर्वात आवडती कादंबरी...तो रोज या पुस्तकाचे पारायण करायचा...ते पाहुन मला हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली...आम्ही दोघांनी अक्षरश: या कादंबरीतील प्रत्येक प्रसंगावरती चर्चा केल्या आहेत.इतकं सुंदर हे पुस्तक आहे. ही कादंबरी वाचायला सुरूवात केली आणी भगवान श्रीकृष्णाचा व माझ्या मनाचा संवाद सुरू झाला.या आधी कितीतरी चरीञकारांनी श्रीकृष्णाचं चरीञ साकारलयं अवतार,चमत्काराच्या अट्टहासाने त्यांनी त्याला आपल्यापासुन शेकडो योजनं दुर नेलं.हे त्यांनी मुद्दाम केलं असं मला म्हणायच नाही....भारतीय समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणजे आपण आपल्या देवतांना चमत्कारांमध्ये आणी महापुरूषांना जातिपातीमध्ये जखडुन ठेवतो. या कादंबरीच वैशीष्ट्य म्हणजे वाचत असताना श्रीकृष्ण देव,परमात्मा,भगवान असा कोणी दुरचा राहत नाही,तो कधी आपला मिञ,सखा,सोबती,भावविश्वस्त होऊन जातो हे कळत देखील नाही. म्रत्युंजय व युगंधरचा आक्रतीबं...

Mrutyunjay Marathi Book Review by Govind Joshi | मृत्यूंजय | Mrityunjay | shivaji sawant

Image
                                                                           मृत्युंजय शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण हिंदुस्थानभर प्रवास करून मनन चिंतनाने हि कथा त्यांनी डाेळस बनविली  खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणी भारलेलं हाेत कर्णाचं जिवण. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडल...